आर्थिक समृद्धी ही वरदान आहे, पण अती झालं की ती शाप होऊ लागते. हे एक दुर्दैवी वर्तुळ आहे—जिथे शरीराला श्रम न देता संपत्ती येते, पण त्या संपत्तीमुळे शरीराची झीज सुरू होते.
शरीराचे श्रम टाळून श्रीमंतीची स्वप्ने पाहणं म्हणजे पायाखालचं जमिन गमावणं. जेव्हा शरीर श्रम करेनासं होतं, तेव्हा मन सुस्तावते, आत्मा गढूळ होतो. "आरामात न्हालेला देह, आजारांना बोलावतो"—हे सत्य आहे, आणि हे आपण जितकं लवकर समजून घेऊ, तितकं आपल्या भविष्यासाठी चांगलं.
मानव हा मूलतः आळशीच...! त्याला जर दडपण नसेल, जबाबदारी नसेल, तर तो निष्क्रियतेच्या खोल दलदलीत अलगद बुडतो. आज कामासाठी जो मजूर, शेतकरी उरला आहे, त्याचं आयुष्य कष्टाचं असलं तरी झोप मात्र गोड असते. बाकीचे सगळे—ऑफिसमधील खुर्चीत गढून गेलेले, AC च्या हवेत घाम न आलेले—हे शरीर आणि मन दोन्ही थकवत चालले आहेत.
"शरीर कष्टाचं सोनं घडवतं, पण श्रीमंती त्याला गंजवते."
संपन्नतेकडे झुकलेल्यांना चालणं, पळणं, श्रम करणं ही संकल्पनाच हास्यास्पद वाटते. व्यायामासाठी वेळ काढणं म्हणजे 'luxury' वाटतो. आणि मग सुरू होतो मानसिक संघर्षांचा खेळ, कारण शारीरिक संघर्ष फार पूर्वी संपवलेला असतो.
वास्तव असं आहे..शरीर उत्तम राहण्यासाठी त्याला झिजवणं आवश्यक आहे. परंतु आजच्या यांत्रिकी युगात शरीर झिजत नाही, फक्त तुटतं, वाकतं, थकलं थकलं वाटतं.
श्रीमंती आली की हाल संपतात, पण हाल संपले की हाल सुरू होतात...आजारांच्या रूपाने.
आपल्याला जाणीव तेव्हाच होते, जेव्हा एखादा आजार दणका देतो. तेव्हा आपण डॉक्टर्सच्या ओपीडीमध्ये धावत जातो, पण लक्षात घ्या... आरोग्याची सुरुवात 'औषधां'पासून नव्हे, 'आचरणां'पासून होते.
आपण असा प्राणी आहोत, जो झोप उशिरा जातो, उठतो उशिरा, निर्णय पुढे ढकलतो, आरोग्य पुढे ढकलतो, आणि शेवटी स्वतःचं जीवन धोक्यात ढकलतो.
" प्रेरणा ही स्वाभाविक नाही, ती मिळवावी लागते..एक सणसणीत मुक्काम मागे उभा असतो तेव्हाच आपण पळायला सुरुवात करतो."
आज शारीरिक श्रमातून पैसे मिळणं कमी झालंय, पण तेच श्रम आता जीव वाचवण्यासाठी आवश्यक झाले आहेत.
व्यायाम, पोहणं, योग, खेळ, बागकाम..हे आता पर्याय नाहीत, तेच नवजीवनाचे प्रवेशद्वार आहेत.
नाहीतर ही समृद्धी आपल्याला थेट रुग्णालयात घालून येईल.
Diabetes, BP, हृदयविकार, कॅन्सर, मानसिक अस्वस्थता, लठ्ठपणा...या सगळ्यांचा उगम एका गोष्टीतूनच — "शरीराला काम न देणं". हे रोग संपत्तीचे साक्षीदार आहेत, पण आरोग्याचे अपयश आहेत.
"आकांक्षांची दुनिया उभी राहिलेली असते मेहनतीच्या खांद्यावर, आणि आरोग्याचं मंदिर उभं राहतं घामाच्या ईंटांवर."
आपण पळालो पाहिजे..पण पैशांच्या मागे नव्हे, स्वतःच्या आरोग्याच्या दिशेने...तिथेच खरी समृद्धी आहे.
धन्यवाद मित्रांनो..!
लेख आवडला असेल, तर आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा.
सकारात्मक विचार शेअर करणे हीच मानसिक आणि सामाजिक शक्ती वाढवण्याची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण प्रेरणादायक विचार इतरांसोबत वाटतो, तेव्हा ती ऊर्जा द्विगुणित होते आणि आपले जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनते. त्यामुळे, चांगल्या गोष्टी शेअर करत राहा आणि एकमेकांना पुढे जाण्यास प्रेरित करा मित्रांनो..!
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment