जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर...तीन गोष्टी शिकल्या पाहिजे..काहीही आपलं नाही..
काहीही आपलं नव्हतं.. काहीही आपलं राहणार नाही..
शैक्षणिक-सामाजिक कार्यक्षेत्रात सामाजिक संवेदनशीलतेचं ज्ञान-भान ठेवत बांधिलकी जपत आपल्या स्वयं-सिद्ध कार्य-कर्तृत्वानं आपल्या निस्वार्थ नेतृत्वाचा ठसा त्या त्या क्षेत्रात उमटवित असतांना.. खूप साऱ्या विरोधाना जसे की जात-धर्म, पंथ-वंश, गोत्र-गात्र,मित्र परिवार, परिसर, संगती,आचार-विचार,बालपण,जडणघडण, शिक्षण,नातेवाईक, आप्तेष्टांचे स्वार्थी व्यवहार, भूतकालीन अपेक्षित-अनपेक्षित घटना, व्यवहारिक हित-संबंध,सामाजिक वावर..राजकीय भूमिका..ई आदि..काही कथोकल्पित घटना ज्यानं व्यक्तीचं अवमूल्यन होईल अश्या खूप साऱ्या गोष्टीनं.. त्या व्यक्तीच्या संघर्षरत व्यक्तिगत निष्ठा आणि त्याच्या व्यवसाईक प्रतिष्ठेवर नक्कीच गालबोट लावून त्याचं खच्चीकरण करणाऱ्या असतात ह्यात शंका नाहीच..
त्याच्या निपजत असलेल्या प्रखर बुद्धीमत्तेला , त्याच्या गुणवत्तेला कदाचीत पारखण्याच्या ह्या प्रक्रियेत अनेकांनी परतीचा मार्ग स्वीकारून मृत्यूलाही कवटाळल्याची अनेक उदाहरणे प्रत्यायास येतात.. तावून-सुलाखून निघणाऱ्या सोन्याचं मूल्यही कोणीही नाकारू शकत नाही हेही अगदी तितकंचं खऱय मित्रांनो..!
मग् परतीची दोर कापून टाकावेत आणि पुढें जावं लढत लढत न रडता रडता..! स्पर्धात्मक परिस्थितिचं आपला कस निश्चित करत आपल्या क्षमतांना आणि कौशल्यांना योग्य दिशा देऊ शकते.. फक्त तेव्हढा संयम राखला गेला आणि वेळेवर काही गोष्टीं सोडल्या तर ह्यांवर ही सहज मात होऊ शकते..
सध्यास्थितीत ज्यांनी ज्यांनी 2008 सालापासून हे सारं भोगत आहेंत त्यांना जीवन संघर्षाच्या झळा दिवसेंदिवस त्यांच कर्तृत्व अधिकाधिक खुलवत त्यांना सक्षमता येतं असून ते ते नेतृत्व संपन्न होत आहेत ही निसर्ग नियमाप्रमाणे बाब उल्लेखनीय आहे..
सन 2008 साली जागतिक पातळीवरच्या मंदीनं भारतातल्या काही क्षेत्राची समीकरण बदलल्यानं त्याचा दीर्घकालीन थेट परीणाम इथल्या जन जीवनावर आता ह्या घडीला अनुभवास येत आहे..
सन 2009-13 पर्यंत महाराष्ट्र राज्यात विशेषतः मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थितीनं इथल्या कृषी प्रधान अर्थव्यवसस्थेत निसर्ग बदलांमुळे सामाजिक अर्थव्यहारात बदल घडवून आणले..
सन 2014 हे वर्षं भारताच्या राजकीय इतिहासात सर्व अपेक्षित-अनपेक्षित बाबींना किनार करीत प्रखर धर्मांध राष्ट्रवाद,प्रतिगामी,मध्य-युगीन विचार मानसिकतेच सरकार सत्तारूढ झालं..त्यानं इथलं सामाजिक वातावारणात धार्मिक ध्रुवीकरण करत इंग्रज नितीचा खुबीनं वापर करीत फोडा जोडा आणि जीव घ्या असल्या धोरणांनं दिवसेंदिवस विविध समाज माध्यमावर द्वेषमूलक बाबींचा प्रचार-प्रसार करीत इथलं समाजमन कलुषित करून इथल्या विविधतेल्या एकतेला आणि त्याच्या सहिष्णुतेला एक कडवं आव्हानं निर्माण करीत प्रत्येकाच्या सामाजिक जीवन-व्यवहारात कलुषितता ओकल्यानं शैक्षणिक-सामाजिक कार्यक्षेत्रातल्या खूप साऱ्यांचं करीअर अंधातरी केलंय..
उरली-सुरली कसर अनपेक्षित लादलेल्या आर्थिक आणिबाणीत नोटबंदी, नव्यानं लादलेली चुकीच्या पद्धतीची GST कर प्रणाली ज्यानं इथल्या लघु-मध्यम उद्योगाचं आर्थिक कंबरडे मोडीत काढून त्यांना दिवाळखोरीत आणलं..
ह्या सर्वं समस्यात अजून भर पडली 2020 साली आलेली कोरोना महामारी ज्यानं कसं बसं उभं राहिलेल्या व्यवसायांना आणि जीवनाला एक विचित्र वळणावर नेऊन ठेवतं दररोज असुरक्षितता आणि भयावह परिस्थिती निर्माण केली.. पण ह्या सर्वं बाबी ना केंद्र सरकारला अन् राज्य सरकारला हाताळता आल्या नाहीत हे मात्र दुर्देवानं इथं नमूद करतो..
दिवसेंदिवस वाढतच जाणारी सामाजिक असुरक्षितता काळोख भविष्य दिसताना वर्तमान अस्वस्थ करून जाते.. दररोज नवी एक समस्या जगणं अवघड करत ह्या अस्वस्थेला कुठंतरी रचनात्मक दिशा मिळतंय का ह्या शोधात असतांना मी काय लिहावं आणि काय काय व्यक्त करावं हे अस्वस्थ करतेय..
Post a Comment