सहिष्णुता हाच भारताचा खरा आत्मा मानणाऱ्या बुद्धिजीवींचं, सत्य आणि अहिंसा ह्या विचारधारेत स्वतःची आणि समाजाची खरी प्रगती आहे हे ओळखून आपल्या विचार-आचारांशी कटिबद्ध असणाऱ्या विचारवंतांची,म. गांधीला प्रेरणा मानणाऱ्या प्रत्येक त्या भारतीयांची प्रेरणाभूमी म्हणजे सेवाग्राम..!
प्रेरणा फाउंडेशन आणि आरंभ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवस 'यात्री निवासला' बापु कुटीच्या शेजारी राहतं आलं हे माझं भाग्य..
आमचे स्नेही मित्र प्रा. विशाल उराडे सरांच्या आणि त्यांच्या आरंभ टीमच्या आग्रहास्तव हे शक्य झालं..इथला परिसर, महात्मा गांधी केंद्रीय हिंदी विश्व-विद्यालय,नई-तालीम, कस्तुरबा गांधी विद्यालय,आहार-सेवा, भांडार आणि पवनार येथील विनोबांचं आश्रम.. ह्या सर्वं ठिकाणी असलेली विनयशीलता, विनम्रता, साधेपणा आणि विशेष आपुलकीनं साधलेला संवाद एक वेगळ्याच आत्मीयतेच्या अनुभूतीनं मन जिंकून गेली..
महात्मा गांधींच्या विचारतला असलेला तो संस्कार इथली संस्कृती बनलेला ज्यानं ती भारतीय अस्सल सहिष्णू विचारांची अस्मिता जपलेला.. सत्याग्रह-स्वातंत्र्याच्या विचाराला स्वयं-सिद्धता प्रदान केलेला एक वैचारिक चमत्कारचं..!
भारताच्या जडणघडणीत आणि वैचारीक सभ्य क्रांतीत गांधीला विसरुन कसं चालेल? गांधी-विचार आजही पथ-प्रदर्शितचं..!
मग् आजचा राजकारणी त्याला उपेक्षित स्थान का देतोय हे मात्र कळणं अवघडचं..!
मला नेहमीच सेवाग्रामचं आकर्षणचं असतं, ह्या भेटीत मात्र खूप काही शिकलो..
थँक्स दिल से..! सळसळता उत्साह आणि विनयशील विनम्रता असलेली 'आरंभ टीम' आणि विशाल सर..
धन्यवाद..
©विद्यार्थी मित्र
🙏🏻 आपलाच विनम्र स्नेहाकिंत आणि आभारी:
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment