पहिल्या 20 बॉल मध्ये 8 रण करणारा तेवतीया 31 बॉल मध्ये 53 रण करून मॅच घेऊन गेला...!!
एक वेळ अशी आली होती की संजू सॅमसन एक धावेसाठी धावत नव्हता, तो स्वतःकडे स्टाईक ठेवत होता, कारण तेवतीया शांत खेळत होता, पण जेव्हा सॅमसन आऊट झाला नंतर तेवतीया ने सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि खतरनाक बॉलर कॉट्रेल च्या एकाच ओव्हर मध्ये 5 सिक्स मारले, आणि मॅच आपल्या पदरात पाडली..!!
म्हणून मित्रांनो आयुष्यात संयम खूप महत्त्वाचा आहे, परिस्थिती बदलायला जास्त वेळ लागत नाही, कधीच कोणत्या कामाला उशीर होत नाही, जोपर्यंत तुम्ही सुरुवात करत नाही, आता सर्व काही संपलय ,मी या पूर्वीच अभ्यास करायला हवा होता, आता ही परीक्षा यशस्वी होणं शक्य नाही, मी मागेच या उद्योगात उतरायला पाहिजे होतं, आता खूप स्पर्धा झाली,हे शब्द डोक्यातून काढा, जेंव्हा तुम्ही सुरुवात कराल तेथून तुमचा काळ सुरू होईल..
पण आयुष्याच्या खेळ पट्टीवर संयमाने आणि शांत डोक्याने खेळा, विजेते तुम्हीच असणार आहे...
शोएब अख्तर ला 20 वर्ष क्रिकेट काय असतं माहीत नव्हतं, 20 व्या वर्षी खेळायला सुरुवात केली, जहीर खान आणि मुनाफ पटेल ला खेळायला बूट नव्हते, वर्गणी काढून बूट घेतले..
10 बाय10 च्या खोलीत राहणारा धोनी क्रिकेट ला कंटाळून रेल्वेची नौकरी जॉईन करतो, पण त्याला रक्तातील क्रिकेट शांत बसू देत नाही, पुन्हा सुरू करतो, कॅन्सर मुळे आता युवराज संपला असं सर्वाना वाटलं पण त्यातून तंदुरुस्त होऊन त्याने भारताला विश्वकप मिळवून दिला...
म्हणून मनातून खचू नका, अशा सोडू नका,प्रयत्न करा यश तुमचे आहे..!!
पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि मग रणात....!!
म्हणून मनाची शक्ती वाढवा, रणात तुम्ही जिंकलाच म्हणून समजा...!!
प्रयत्न सोडू नका,एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही आयुष्याची कित्येक वर्षे खर्च केली आणि शेवटी कंटाळून तुम्ही प्रयत्न सोडला, तर तुम्ही स्वतःच खूप मोठं नुकसान करून घेतलं असं समजा कारण तुम्हालाच माहीत नाही की तुम्ही यशाच्या किती जवळ होता...!!
कदाचित पुढील एक दोन प्रयत्नात तुम्ही विजयी सुद्धा झाला असता...!!
म्हणून मित्रांनो;
Don't give up;
Keep it up your effort...;
Success is yours..!!
Post a Comment