मर कर भी न जाएगी वतन की उल्फ़त,
मेरी मिट्टी से भी खुश्बू ए वतन आयेगी !!
-शहीद भगत सिंह
मरण येणे खूप सोपे असते कारण एकतर ते निसर्गाने दिलेले असते नाही तर आपण स्वतःहून ओढवून घेतलेले असते. जे सध्या ची युवा पिढी करत आहे...मरण ओढवून घेण्यासाठी फार दम लागत नाही, अनेक पर्याय उपलब्ध आहेत. चिंता, दोर, विष, नदी, नाले, विहीर, डोंगर आणि कधी तरी बादली पण पुरेशी आहे... आयुष्याला इतके कंटाळलेत सगळे की जणू यांचे दुःख निवारण्यासाठी आत्महत्या हा एकमेव पर्याय आहे... असो,
आज भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते, आणि म्हणून आजचा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. हे तिघे जेव्हा फासावर गेले तेव्हा भगतसिंग आणि सुखदेव 23 वर्षाचे होते तर राजगुरू 22 वर्षाचे होते. या वयात त्यांनी देशासाठी प्राण पणाला लावले होते. तेव्हा माझं घर,माझा परिवार असा विचार केला नाही. मरतानाही जे हसत होते तेच खरे देशभक्त होते. सरकारने रोडवरच्या खांब्याला लाईन दिली आणि दिवसभर लाईट सुरूच आहेत, आणि कोणी हा मुद्दा उचलला तर लगेच म्हणतात, तुझं बिल जळतय का?? दिवसभर नळ सुरू असेल आणि बंद करण्याविषयी कोणी बोलले तर तुझं पाणी वाया जातंय का?? असे बोलले जाते. घरातून गल्लीवर कचरा फेकणाराच म्हणतो, देशात स्वच्छता राहिलेली नाही. इथे थुंकू नये ची पाटी का लावावी लागते??
वरील सर्व कोणामुळे घडते??? याला आपणच कारणीभूत आहोत. सरकारने सोयी दिल्या पण त्या बदल्यात आपल्याच खिशातून पैसे जाताय हे अजूनही आम्हाला समजत नाही. स्वच्छता घरातून आपल्या गल्लीपर्यंत जरी असली ना तरी पुरे आहे. कोणीच म्हणत नाही गावात जाऊन कचरा उचला, आणि उचलला तरी फार फरक पडणार नाही कारण तो आपणच केलाय...गोष्टी खूप छोट्या आहेत फक्त समजत नाही हा मोठा विषय आहे. देशाचा एक नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडले, तरी खूप आहे. पण हल्ली, अधिकार हवा पण जबाबदारी नको असे आमचे झाले आहे. त्यातही तरुण पिढी चे सांगायलाच नको...
मरायचं आहे तर देशासाठी मरा. जसे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी स्वीकारले...अस पोरीसाठी, मार्कासाठी का मरता?? ज्याचे कारण सांगायला सुद्धा आईवडिलांना लाज वाटेल...
"मरावे परी किर्तीरूपी उरावे"
मृत्यू कोणालाच चुकला नाही. पण ज्याने जन्म घेऊन आईवडिलांसाठी, देशासाठी काही केले नाही, तो या धरतीलाच भार असतील...निव्वळ फौज, पोलीस भरतीत जाणे म्हणजे समाजसेवा नाही तर घरात राहून देखील आपण समाजसेवा करू शकतो. न्यायासाठी जसे लढता तसे देशाच्या हितासाठी लढा... कधी काठी, कधी हिम्मत, कधी नारे तर कधी कलम घेऊन...
एवढे जरी आपण नाही करू शकलो तर आपण या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही..
#BhagatSingh
Post a Comment